गुरांच्या बाजारात मालती-मलण्णाला त्यांचा चोरलेला बैल दिसला. चोराला सांगूनही तो चोरीची कबुली दयायला तयार होईना, तेव्हा मालतीने झटकन बैलाच्या डोक्यावर हात ठेवला व त्याला प्रश्न विचारला, “सांग बरं, याचा कोणता डोळा अधूआहे, डावा की उजवा?” चोर म्हणाला, “माझ्या बैलाचा डावा डोळा अधूआहे.” यावर मालतीने ते तपासून घेऊ, असे चोराला म्हटले आणि चोर त्यात अडकला. कारण मालतीच्या बैलाचे दोन्ही डोळे चांगले होते. चोर पकडण्यासाठी मालतीने ही युक्ती केली.