Question
मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?

Answer

  • मानवी वस्तीकरता जमिनीचा उतार व सुपीकता, अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता खनिजसाठा, वाहतुकीच्या सोई इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण असतात. अशा प्रकारची स्थिती जेथे उपलब्ध होते तेथे मानवी वस्त्यांची वाढ होते.
  1. उदा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार आणि भारतातील शेतीखालील इतर भाग या ठिकाणी मानवी वस्ती केंद्रित स्वरूपाची आहे.
  2. तर, ब्राझीलमध्येही किनारपट्टीजवळील सावो पावलो हा कॉफीच्या उत्पादनासाठी सुयोग्य प्रदेश आहे. शिवाय, सागर सान्निध्य, मुबलक खनिजसाठा, वाहतुकीच्या सोई यांमुळे येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आहे.
  • याउलट, जेथे मानवी वस्तीस फारशी अनुकूल स्थिती नाही, त्या ठिकाणी विखुरलेली मानवी वस्ती आढळते.
  1. उदा. भारतात हिमालयाच्या उतारावरील प्रदेश, विखंडित व उंचसखल प्रदेश, मध्य भारताचा वनाच्छादित प्रदेश, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग इत्यादी ठिकाणी मानवी वस्ती विखुरलेली आहे.
  2. तसेच, ब्राझीलमध्ये ईशान्य भागातील अवर्षणग्रस्त उच्चभूमीच्या प्रदेशात मर्यादित शेती आणि ॲमेझॉन खोऱ्यात घनदाट विषुववृत्तीय वने, रोगट हवामान व वाहतुकीच्या मर्यादित सोई यांमुळे याठिकाणी विखुरित वस्त्या आढळतात. याला अपवाद निग्रो व ॲमेझॉन नद्यांच्या संगमावरील मॅनॉस बंदर.
    अशारीतीने, एकूण देशांचा विचार करता हवामान जमिनीचा उतार व सुपीकता, पाण्याची उपलब्धता, वाहतुकीच्या सोई यांमध्ये भिन्नता असल्याने मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानी झालेली आढळते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रीय पक्ष

पुढील तक्ता पूर्ण करा.
मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      
ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक सांगा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.

आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल?
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे?