मी सुट्टीत संतश्रीरामदास’ यांचे छोटेसे चरित्रवाचले. लहानपणी पोहण्यात पटाईत असलेला, झाडावरून उड्या मारणारा नारायण, मठिपणी तपश्चर्या करून सत रामदास होतात. समाजाला प्रयत्नांची कास धरायला शिकवतात. अक्षर कसे काढावे?, विदयार्थ्यांनी पाठांतर कसे करावे? हेही सांगतात. आळस करू नये असे बजावतात.
नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचे पूर्ण नाव पण त्यांनी ‘दास’ किंवा ‘रामदास’ या नावाने उदंड लेखन केले आहे. मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम या त्यांच्या मुख्य रचना. विदयार्थ्यांनी मनाच्या श्लोकाचे पाठांतर केल्यास त्यांच्यावर सुविचारांचा प्रभाव राहील यात शंका नाही.