(१) कारणे दया:
(i) बिबळ्या एकाच झेपेत जंगलात अदृश्य झाला; कारण
(ii) चालताना वनमजूर अचानक थबकला; कारण
ता. २७ मे १९९७, वेळ सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो.
गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेन पाहिलं, तर त्यानं रस्त्याकड बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही.
अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकड होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं; पण तेवढ्यात टांगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.
बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून भी हळहळलो. टांगे यांना शरभिदं झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढं निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथ दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहात असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पावल टाकणं आवश्यक होत.
कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा भारताना टोंगेंनी मला त्या परिसरात चार पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होत. प्रचंड उप्णतेचे दिवस असल्यानं वाधासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणदेखील शक्य नव्हतं; पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर ! पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, कुणाचा जीवदेखील घ्यायला भाग पुढ बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या
मनावर एक अनामिक दडपण आल होत.
दहा-बारा पावलंच चाललो असू. मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पगमार्क्सकडं बधून लक्षात आलं, की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाधीण अदयाप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बधायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे शंभर- सव्वाशे पावलावर नाल्यात थोडस पाणी असल्याचं मला माहीतच होत. ही वाधीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होत. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळ पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती.
पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल, या जाणिवेनंच माझा धसा कोरडा पडला. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यानीच एकमेकांकड बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एकेक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठतरी झाडाच्या बुंध्याआड, जांभळीच्या झुडपात लपलेली वाधीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार, असंच वाटत होत. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळदेखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा, असं वाटत होत.
2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) बिबळा येथे बसला होता. -______________
(ii) जंगलातील सगळ्यात धोकादायक जनावर -____________
3. स्वमत कृत्ती :
• 'डायरी लिहिणे' हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा.
(१) कारणे दया:
(i) कारण - वनरक्षकाचा पाय वाळक्या काटक्यावर पडून झालेला आवाज तिखट कानाच्या विवळयाने ऐकला होता.
(ii) कारण - त्या रस्त्यावरून नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या विबळयाची ताजी पावले उमटली होती.
2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये
(ii) लहान पिल्ले असणारी वाघीण
3. स्वमत कृत्ती :
• आपल्या जीवनात आपल्याला अनेक तन्हेत-हेचे अनुभव येतात. वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात. आपण या घटना- प्रसंगाचे साक्षीदार असतो. त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात. कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो. एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही. प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो. विशेष प्रसंगातील असे अनोमोल क्षण जपून ठेवायचे असतील; तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे. दररोज डावरीचे लिखाण केले तर, विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यांसमोर ताजेतवाने होत राहतील. शिवाय सातत्याने डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल. म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे.



