Question 16 Marks
कोणत्याही अपरिचित माणसाची खाजगी माहिती काढताना आपण त्याचा मित्रपरिवार पाहतो. तो कोणाबरोबर वावरतो यावरून त्याच्या आवडीनिवडींची आपल्याला कल्पना येते. कारण माणूस हा नेहमी त्याच्या संगतीतल्या मित्रपरिवारावरून ओळखला जातो. जीवनात संगतीचे महत्त्व फार आहे. जशी संगत लाभेल, तसे गुण माणसात उतरत असतात. फुलांच्या संगतीने मातीला सुगंध लाभतो, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाला सोन्याची झळाळी प्राप्त होते. मुलांच्या कोवळ्या संस्कारक्षम वयात संगतीला खूप महत्त्व असते. कुसंस्कारित संगत लाभलेली मुलेही वाईट मार्गाला जातात. महात्माजींना जेव्हा वाईट मुलांची संगत लाभली तेव्हा त्यांनी चोरी केली व वडिलमाणसांना फसविले. 'वाल्या' कोळी हा देखील एक दरोडेखोर होता. परंतु नारदमुनींनी त्याचे डोळे उघडल्यावर तो वाल्मिकी ऋषी झाला आणि रामायणाची निर्मिती झाली. 'अंगुलीमाल' नावाचा दरोडेखोर गौतम बुद्धांचे मार्गदर्शन लाभल्यावर अंतर्बाह्य बदलला. पुढे तोच भगवान गौतम बुद्धांचा पट्टशिष्य बनला. नामदेवालाही वाईट संगत लाभली आणि तो दरोडेखोर बनला. परंतु ज्ञानदेवांचा सहवास लाभल्यावर तोच 'संत नामा' झाला म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात- 'संग जया जैसा लाभ तया तैसा। होतसे अपैसा अनायासे ।।' असे होऊ नये म्हणून कविश्रेष्ठ मोरोपंत परमेश्वराकडे प्रार्थना करतात- 'सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो।'
Answer
View full question & answer→सारांश : माणूस हा नेहमी त्याच्या संगतीतल्या मित्रपरिवारावरून ओळखला जातो. जीवनात संगतीचे महत्त्व फार आहे. जशी संगत लाभेल, तसे गुण माणसात उतरत असतात. मुलांच्या कोवळ्या संस्कारक्षम वयात संगतीला खूप महत्त्व असते. कुसंस्कारित संगत लाभलेली मुले वाईट मार्गाला जातात. म्हणून चांगली संगत लाभणे खूप आवश्यक आहे.