Questions

[3 Marks Questions]

Take a timed test

3 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 13 Marks
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
Answer
न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली.
  1. घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन, या कायद्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
  2. वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली.
  3. प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली.
  4. खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला.
    न्यायालयाने दिलेल्या निर्णयांतून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले.
View full question & answer
Question 23 Marks
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
Answer
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे -
  1. ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे.
  2. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.
  3. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.
  4. सर्वांना विकासाची समान संधी देणे.
  5. संविधानाने सामाजिक न्याय व समता या मूल्यांवर आधारित एक नवा समाज निर्माण करण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे.
  6. यासाठी सर्व समाजघटकांना सामावून घेण्याबाबत काही प्रयत्न केले जातात. उदा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, वंचित घटकांकरता शिक्षण व रोजगारामध्ये राखीव जागांची तरतूद, अल्पसंख्याकांना समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यांबाबत तरतूद, तसेच स्त्रियांसाठीचे विविध कायदे इत्यादी.
View full question & answer
Question 33 Marks
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
Answer
भारतीय संविधानाने सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान २१ वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा १८ वर्षे करण्यात आल्याने
  1. युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले.
  2. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.
  3. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.
  4. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली.
    युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.
View full question & answer