Questions

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

Take a timed test

3 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 18 Marks
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

              कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी
               तो अरबी सागर लागे जयाचे पाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

ही मायभूमि धीरांची। शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
              स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे। करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
              या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

धर ध्वजा करी ऐक्याची। मनीषा जी महाराष्ट्राची
पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची
घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची
              उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया
               महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

2. आकलन कृती

(१) चौकटी पूर्ण करा :
(१) शिवरायांना म्हटले आहे  - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(२) पर्वत उलथायचे आहेत - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(३) तलवार आहे ती - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(१) महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ घे.
(शपथ / तलवार / कंकण / स्वप्ने)

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• ही मायभूमि धीरांची। शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची। खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहिरांची। त्यागाच्या तलवारीची
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

4. स्वमत :
• कवितेतून व्यक्त झालेली 'महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता' हा विचार स्पष्ट करा.
Answer
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
(१) धुरंधर
(२) प्रयत्नांचे
(३) त्यागाची
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(१) शपथ 

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• ही माझी मातृभूमी धैर्यवंतांची आहे. वीर राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. ही संतांची, शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे. ज्या भूमीवर श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे.

4. स्वमत :
• महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात. रथीमहारर्थीनी तिला भूषवले आहे. अरबी समुद्र तिच्या चरणांशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्यांचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला आणि त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे.
View full question & answer
Question 28 Marks
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

              कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी
               तो अरबी सागर लागे जयाचे पाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

ही मायभूमि धीरांची। शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
              स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे। करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
              या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

धर ध्वजा करी ऐक्याची। मनीषा जी महाराष्ट्राची
पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची
घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची
              उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया
               महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

2. आकलन कृती

(१) चौकटी पूर्ण करा :
(१) पर्व आले आहे  - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 
(२) शेतकऱ्यांची दोन अवजारे - ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ व ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• महाराष्ट्र मंदिरापुढती। पाजळे याशीची ज्योती।
सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती। भूषवी तिला महारथी
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया।।

4. स्वमत :
• 'घर ध्वजा करी ऐक्याची। मनीषा जी महाराष्ट्राची' या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
Answer
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image


2. आकलन कृती

(१) चौकटी पूर्ण करा :
(१) संयुक्त महाराष्ट्राचे
(२) खुरपे दोरी

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे वीरपुरुषांनी आहुती दिलेल्या यज्ञाची (यशाची) ज्योत जळत आहे. सोन्याची (नररत्नांची खाण व कसदार) धरणी खाली नि वर निळे आकाश भरले आहे. सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे. या महाराष्ट्रभूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे, त्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण ओवाळून टाक.

4. स्वमत :
• मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, तेव्हा त्याला काहीजणांनी विरोध दर्शवला. खूप साधकबाधक चर्चा झाली. परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत होता फूट पडू नये; म्हणून शाहीर म्हणतात, की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या, अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया.
View full question & answer
Question 38 Marks
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

              कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी
               तो अरबी सागर लागे जयाचे पाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

ही मायभूमि धीरांची। शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
              स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे। करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
              या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
              महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

धर ध्वजा करी ऐक्याची। मनीषा जी महाराष्ट्राची
पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची
घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची
              उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया
               महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

2. आकलन कृती

(१) असत्य विधान ओळखा :
(i) धुरंधर शिवरायांना स्मरावे.
(ii) असत्यास्तव शिंग फुंकावे.
(iii) स्वातंत्र्याची आण घ्यावी.
(iv) जन्मभूमीचे उपकार फेडावे.
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(१) हातात ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ ध्वजा घर.
(सामंजस्याची / वीरांची / एकजुटीची / धुरंधराची)
(२) मैदानात शिंग ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ साठी फुंकायचे आहे.
(हत्या / सत्या / विदधा / असत्या)

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

4. स्वमत :
• कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.
Answer
1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image


2. आकलन कृती

(१) असत्य विधान ओळखा :
असत्य विधान असत्यास्तव शिंग फुंकावे
(२) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(१) एकजुटीची 
(२) सत्यासाठी 

3. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

(१) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा :
• महाराष्ट्राची महती गाताना शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात - ज्या महाराष्ट्राच्या चरणांना अरबी समुद्र वंदन करतो, त्या प्रिय महाराष्ट्रावर स्वतःचा जीव ओवाळून टाक. समर्पित हो.

4. स्वमत :
• या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचीती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवीने वीररसाचा मुक्त वापर केला आहे. 'कंबर बांधून ऊठ घाव झेलाया। महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया' या पहिल्या दोन ओळींत शाहिरांनी मर्दमराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे. 'करी कंकण बांधून साचे', 'सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया', 'पर्वत उलथून यत्नाचे', 'घर ध्वजा करी ऐक्याची', 'पाऊले टाक हिंमतीची', 'घे आण स्वातंत्र्याची' अशा प्रकारच्या ओळींमधून ओजगुण ओतप्रोत भरला आहे. मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरली आहे.
View full question & answer