Question 17 Marks
1. आकलन कृती
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा.
कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात, की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं 'आजी'चं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप 'वृद्धाश्रमा 'कडे वळतात. असे प्रसंग मग मनं दुःखी करून जातात.
जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास! तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात, अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं! ज्याला शब्दांचं क्षितिजच काय; पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते, आपल्याला पुढे नेणारी ! नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी !
2. आकलन कृती.
(१) उताऱ्यात सांगितलेला निसर्गाचा नियम
3. स्वमत :
• 'नातं' या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा.
| तारुण्यातील नात्याचा प्रवास | वार्धक्यातील नात्याचा प्रवास |
कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात, की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं 'आजी'चं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप 'वृद्धाश्रमा 'कडे वळतात. असे प्रसंग मग मनं दुःखी करून जातात.
जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास! तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात, अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं! ज्याला शब्दांचं क्षितिजच काय; पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते, आपल्याला पुढे नेणारी ! नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी !
2. आकलन कृती.
(१) उताऱ्यात सांगितलेला निसर्गाचा नियम
3. स्वमत :
• 'नातं' या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
Answer
View full question & answer→1. आकलन कृती
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा."
2. आकलन कृती.
(१) पिकलेले पान गळून पडल्यावर नवीन पालवी फुटतेच; म्हणजे काही माणसे मरण पावत असली, तरी नवीन जीव जन्माला येतात, हा निसर्गाचा नियम आहे.
3. स्वमत :
• नाते म्हटले की अमुक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यांसमोर येत नाही. आईबाबांपासून ते इमारती, डोंगरदऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यांसमोर तरळतात. मुलगा आजारी असताना रात्र रात्र जागून हवं नको ते बघणारी आई आठवते. एखाद्या परीक्षेत किंवा स्पर्धेत मुलाला अपयश आले, तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात. मी काही चांगले केले की, ताई-दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात. नातेवाइकांनाही कौतुक वाटते. कधी कंटाळा आला, तर शेजारी जाऊन बसावेसे वाटते. एखादया दिवशी गाठभेट घडली नाही, तर मित्रमैत्रिणी व्याकूळ होतात. आपल्या आवडत्या खेळाडू-कलावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्यालाच आनंद होतो. आवडते प्राणी, झाडे यांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळावे असे वाटते. आवडती ठिकाणे, इमारती तर मनात घरच करून टाकतात, अशी ही नाती म्हणजे दुधावरची सायच !
(१) जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा."
| तारुण्यातील नात्याचा प्रवास | वार्धक्यातील नात्याचा प्रवास |
| तारुण्यात अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावनाविकारांनी मन व्यापलेले असते. | विविध भावनाविकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ, निकोप बनून जाते. |
2. आकलन कृती.
(१) पिकलेले पान गळून पडल्यावर नवीन पालवी फुटतेच; म्हणजे काही माणसे मरण पावत असली, तरी नवीन जीव जन्माला येतात, हा निसर्गाचा नियम आहे.
3. स्वमत :
• नाते म्हटले की अमुक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यांसमोर येत नाही. आईबाबांपासून ते इमारती, डोंगरदऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यांसमोर तरळतात. मुलगा आजारी असताना रात्र रात्र जागून हवं नको ते बघणारी आई आठवते. एखाद्या परीक्षेत किंवा स्पर्धेत मुलाला अपयश आले, तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात. मी काही चांगले केले की, ताई-दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात. नातेवाइकांनाही कौतुक वाटते. कधी कंटाळा आला, तर शेजारी जाऊन बसावेसे वाटते. एखादया दिवशी गाठभेट घडली नाही, तर मित्रमैत्रिणी व्याकूळ होतात. आपल्या आवडत्या खेळाडू-कलावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्यालाच आनंद होतो. आवडते प्राणी, झाडे यांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळावे असे वाटते. आवडती ठिकाणे, इमारती तर मनात घरच करून टाकतात, अशी ही नाती म्हणजे दुधावरची सायच !












