Question
‘भरकटलेल्या जगात नाही, संस्कारांची जाण कुणाला’

Answer

उपरोक्त पंक्ती ‘जीवन गाणे’ या कवितेतून घेतली असून कवी ‘नितीन देशमुख’ निसर्गातील प्रत्येक घटक आपणांस काही मूल्ये व संस्कार शिकवित असतात हे सोदाहरण पटवून देत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात संस्कारांची वानवा आहे. प्रसिद्धी आणि पैसा मुख्य ध्येय मानून मूल्ये गुंडाळून ठेवली जात आहेत.
जग भरकटलेले आहे. चांगल्या गोष्टींची घसरण होत चालली आहे. पण याही काळात तुळशीपुढे तेवत असलेल्या पणतीने मला शिकवले, तू असाच जळत रहा. प्रकाश देत रहा. अंधार, अज्ञान दूर सारत रहा. आजुबाजूला असलेल्या अनेक घटकांमधून बोध घेण्यासारखा आहे. मातीच्या पणतीने मला जळत रहायला, पेटत रहायला शिकवले. पणतीचे रुपक प्रस्तुत कवितेत वापरले असल्याने आशयसौंदर्य निर्माण झाले आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा।
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।
तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा!
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा!
पायाभरणी अस्तित्त्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत,
रगारगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे? स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले!
प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे? स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले!
शिकू धीरता, शूरता, बीरता
धरू थोर विधेसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा।
कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गतम वा कधी भरारी थेट
तुम्हांला माहीत असलेल्या संतांविषयी तुमच्या शब्दांत विचार मांडा.
सागराची अथांगता अन्, ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले!