Question
भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?

Answer

  1. पर्जन्यमान आणि हवामान हे वनस्पती जीवनावर परिणाम करणारे मुख्य घटक आहेत.
  2. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे. देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो.
  3. भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. या नैसर्गिक स्थितीमध्ये पानझडी वृक्ष अधिक जास्त प्रकारे अनुकूलन साधतात. ज्या प्रदेशात १००० ते २००० मिमी दरम्यान पर्जन्यामान आहे. तेथे पानझडी वृक्ष आढळतात.
  4. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये, म्हणून या वनांतील वृक्ष पाने गाळतात. त्यामुळे, भारताचे हवामान आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळवून घेणाऱ्या साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी पानझडी वनस्पती येथे अधिक प्रमाणात आढळतात.
    याचाच अर्थ, भारतात सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

फरक स्पष्ट करा.

ब्राझीलमधील संदेशवहन व भारतातील संदेशवहन

ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Image

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Image

ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Image

गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.