(१) व्याख्या : थॉमसन वॉरन यांनी असे प्रतिपादन केले आहे की, "शासन, व्यापार, उत्पादन आणि तत्सम उपक्रम ज्या ठिकाणी होतात, त्या ठिकाणी कृषी व्यवसायाशी संलग्न असलेल्या लोकांनी स्थलांतरण करण्याची प्रक्रिया म्हणजे नागरीकरण होय."
(२) स्पष्टीकरण : एंडरसन यांनी असे प्रतिपादन केले आहे की, "ग्रामीण भागातील लोकांनी शहरी भागात स्थलांतरण करणे, कृषीविषयक व्यवसायांच्याऐवजी उद्योग, व्यापार व नोकरी या व्यवसायांचा स्वीकार करणे आणि त्यामुळे त्यांच्या पारंपरिक प्रवृत्ती, श्रद्धा, मूल्ये आणि वर्तनात होणारे परिवर्तन या समग्र प्रक्रियेस 'नागरीकरण' असे म्हणतात."
(३) औद्योगिकीकरण : नागरीकरणाच्या प्रक्रियेला १८व्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आलेल्या औदयोगिकीकरणाने चालना दिली.
(४) भारतातील नागरीकरण : भारतात ही प्रक्रिया १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्यास वेग प्राप्त झाला.