(१) १९७८ पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मल्यानंतर वर्षभरातच अनेक दुर्धर रोगांनी मृत्यू पावत असत.
(२) या रोगांत पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांचा समावेश होता.
(३) औषधोपचाराअभावी बालमृत्यूची संख्या जास्त असे.
(४) त्यामुळे या रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने सुरू केला व १९९५ मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.