Questions

इतिहास - टिपा लिहा : [ SHORT NOTE-2]

Take a timed test

4 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 12 Marks
अणुशक्तीबाबतचे भारताचे धोरण आणि प्रगती.
Answer
(१) शांततेसाठी अणू ऊर्जेचा वापर करण्याचे भारताचे सुरुवातीपासूनच धोरण राहिलेले आहे.
(२) डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला.
(३) १९७४ साली भारताने प्रथमच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर १९९८ साली आणखी अणुचाचण्या करून भारत अण्वस्त्रधारी देश बनला.
(४) भारताने अणुशक्तीचा वापर वीजनिर्मिती, औषधे, संशोधन आणि संरक्षण साहित्याची निर्मिती यांसाठी केला.
View full question & answer
Question 22 Marks
पंडित नेहरू यांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये.
Answer
(१) पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते.
(२) भारताचा सामाजिक-आर्थिक विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
(३) दारिक्रयावर मात करण्यासाठी त्यांच्याच नेतृत्वाखाली नियोजन आयोगाची निर्मिती होऊन 'पंचवार्षिक नियोजनाच्या मार्गाने विकास' हे धोरण ठरवण्यात आले.
(४) पंडित नेहरू हे 'भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार' होत.
View full question & answer
Question 32 Marks
धवलक्रांती.
Answer
(१) स्वातंत्र्यानंतर नव्या उदद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उ‌द्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले.
(२) डॉ. वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्हयातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली.
(३) सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्धप्रकल्प विकसित केला गेला.
(४) डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली. डॉ. कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही 'धवलक्रांती' घडवून आणली.
View full question & answer
Question 42 Marks
जागतिकीकरण.
Answer
(१) 'जागतिकीकरण' म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. म्हणजेच 'जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय.
(२) जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली, आर्थिक उदारीकरण घडून आले.
(३) उद्योग-व्यवसायांत अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.
(४) जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत बदल घडून आले.
View full question & answer