(१) भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा आयआयटीचा प्रमुख उद्देश आहे.
(२) १९५१ मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे पहिली आयआयटी संस्था स्थापन झाली.
(३) त्यानंतर पवई (मुंबई), चेन्नई, कानपूर आणि नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे आयआयटीमध्ये रूपांतर करणयात आले.
(४) या संस्थांच्या उभारणीत सोव्हिएत रशिया, अमेरिका, जर्मनी व युनेस्को यांनी मदत केल्यामुळे या संस्था उभ्या राहिल्या.