Question
द्रवीकरण व स्फटिकीकरण या प्रक्रियांमुळे कायिक विदारण होते.

Answer

(१) समुद्रकिनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो, तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते व सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात.
(२) या क्षारयुक्त पाण्यात खडकांतील विद्राव्य घटक मिसळतात, त्यामुळे खडकांत लहान छिद्रे तयार होतात. हा द्रवीकरणाचा परिणाम होय.
(३) अशा छिद्रांतून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षाराचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे खडकांत ताण निर्माण होतो व खडकावर छिद्रे तयार होऊन खडकाचा पृष्ठभाग मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे दिसू लागतो. अशा प्रकारे, द्रवीकरण व स्फटिकीकरण या प्रक्रियांमुळे कायिक विदारण होते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ऑस्ट्रेलियाच्या केवळ पूर्व किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त आहे.
दहिवरामुळे कायिक विदारण होते.
बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्राची क्षारता जास्त आहे.###भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.
वातावरणात उंचावर पावसाच्या पाण्याचे थेंब तयार होतात.
सागरजलाच्या क्षारतेत विभिन्नता दिसून येते.
वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.
हिवाळ्यात सकाळी गवताच्या पात्यांवर पाणी आढळते.
तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते.
महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही.
विषुववृत्तीय समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही.###किंवा विषुववृत्तीय भूभागात दुपारनंतर पाऊस पडतो.