Questions

भूगोल - भौगोलिक कारणे लिहा [REASON -3]

Take a timed test

5 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 13 Marks
रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
Answer
(१) खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते.
(२) पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. त्यामुळे पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यात पदार्थ विरघळल्यामुळे त्याची विद्राव्यता वाढते व पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात.
(३) पाण्यामुळे कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण इत्यादी प्रक्रिया जलद गतीने घडून येतात व त्यामुळे रासायनिक विदारण घडून येते. अशा प्रकारे, रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
View full question & answer
Question 23 Marks
द्रवीकरण व स्फटिकीकरण या प्रक्रियांमुळे कायिक विदारण होते.
Answer
(१) समुद्रकिनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो, तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते व सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात.
(२) या क्षारयुक्त पाण्यात खडकांतील विद्राव्य घटक मिसळतात, त्यामुळे खडकांत लहान छिद्रे तयार होतात. हा द्रवीकरणाचा परिणाम होय.
(३) अशा छिद्रांतून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षाराचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे खडकांत ताण निर्माण होतो व खडकावर छिद्रे तयार होऊन खडकाचा पृष्ठभाग मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे दिसू लागतो. अशा प्रकारे, द्रवीकरण व स्फटिकीकरण या प्रक्रियांमुळे कायिक विदारण होते.
View full question & answer
Question 33 Marks
वालुकाश्म, पिंडाश्म यांसारख्या दगडांचे पाण्यामुळे कायिक विदारण (कणात्मक विदारण) होते.
Answer
(१) वालुकाश्म, पिंडाश्म यांसारखे खडक हे केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पडल्याने तयार होतात.
(२) काही प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानेही या खडकांचे विदारण घडून येते.
(३) या खडकांत पावसाचे पाणी मुरले की, एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात. हे कण मूळ खडकांपासून अलग होऊ लागतात. याला कणात्मक विदारण म्हणतात. अशा प्रकारे, वालुकाश्म, पिंडाश्म यांसारख्या दगडांचे पाण्यामुळे कायिक विदारण (कणात्मक विदारण) होते.
View full question & answer
Question 43 Marks
दहिवरामुळे कायिक विदारण होते.
Answer
(१) ज्या प्रदेशात तापमान काही काळ ०° से पेक्षा कमी असते, तेथील खडकांतील तडांमध्ये साचलेले पाणी गोठून त्याचा बर्फ होतो.
(२) पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते व खडकांत ताण निर्माण होतो.
(३) परिणामी खडक छिन्न-भिन्न होऊन फुटतात. अशा प्रकारे, दहिवरामुळे कायिक विदारण होते.
View full question & answer
Question 53 Marks
तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते.
Answer
(१) वाढत्या तापमानामुळे खडकांतील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण-आकुंचनामुळे खडकांतील कणांत ताण निर्माण होतो.
(२) याशिवाय खडकांतील काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात, तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकांतील कणांमुळे निर्माण होणारा ताणही कमी-जास्त होतो. परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात.
(३) उष्ण वाळवंटी प्रदेशासारख्या दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असणाऱ्या प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. अशा प्रकारे, तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते.
View full question & answer