Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - बाह्यप्रक्रिया भाग-१3 Marks
Question
तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते.
✓
Answer
(१) वाढत्या तापमानामुळे खडकांतील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण-आकुंचनामुळे खडकांतील कणांत ताण निर्माण होतो. (२) याशिवाय खडकांतील काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात, तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकांतील कणांमुळे निर्माण होणारा ताणही कमी-जास्त होतो. परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात. (३) उष्ण वाळवंटी प्रदेशासारख्या दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असणाऱ्या प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. अशा प्रकारे, तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.