विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात मुलांपुढे ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. अशा वातावरणात नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी त्यांना मिळत आहेत, अशा वातावरणात मुलांच्या विचाराच्या कक्षा रुंदावत आहेत. नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आजच्या प्रगतीची परिभाषा आहे. सतत अभ्यास, सतत प्रगती करून देशाला प्रगतीपथावर नेऊन सर्वप्रकारचे भेदाभेद मिटवूया असा भाव या कवितेतून कवीने व्यक्त केला आहे.