(१) पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्पांचा विकास होऊ शकतो.
(२) ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन व संस्कृती यांसारख्या घटकांचा पर्यटनात समावेश केल्यास पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते व समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करता येतो.
(३) महाराष्ट्रातील मेळघाटमधील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार यांसारख्या आदर्श गावांना भेट देणे इत्यादींसारख्या पर्यटनातून सामाजिक जाणीव निर्माण होते व तेथील विकासाला चालना मिळते.
(४) भारतात अशा प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव असून भविष्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकेल.