(१) खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते.
(२) पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. त्यामुळे पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यात पदार्थ विरघळल्यामुळे त्याची विद्राव्यता वाढते व पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात.
(३) पाण्यामुळे कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण इत्यादी प्रक्रिया जलद गतीने घडून येतात व त्यामुळे रासायनिक विदारण घडून येते. अशा प्रकारे, रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.