(१) आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून, जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे.
(२) शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूर दूरच्या देशांतही होत आहे. त्यामुळे या सर्वांत उत्तम समन्वय ठेवण्यासाठी, तारीख व वार यांत प्रवासामुळे होणारा बदलातील गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
(३) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे.