Question
भारताचे परराष्ट्र धोरण.

Answer

(१) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अन्य देशांशी कसे संबंध ठेवायचे याबाबत देशाने ठरवलेल्या धोरणास 'परराष्ट्र धोरण' असे म्हणतात.
(२) १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्याने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली.
(३) भारताचे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता आणि मानवाधिकार या मूल्यांवर आधारलेले आहे.
(४) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यावर भारत भर देतो.
(५) भारताच्या संविधानात कलम ५१ मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या यादीप्रमाणे भारताचे परराष्ट्र धोरण आखले जाते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free