(१) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नव्हे; तर देशात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा, हा नवा विचार शीतयुद्धानंतर पुढे आला.
(२) मानवी सुरक्षेत निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे, याचाही समावेश होतो.
(३) अल्पसंख्य व दुर्बलांचे रक्षण ही बाबही मानवी सुरक्षेत समाविष्ट असते.
(४) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे, ही बाबही विचारात घेतली जाते.