(१) प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था अमलात आणते, करते, त्या व्यवस्थेला 'राष्ट्रीय सुरक्षा' असे म्हणतात.
(२) राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी, नदी पाणीवाटपासंबंधी वाद निर्माण होतात.
(३) निर्वासितांचे लोंढे येऊन संघर्ष उद्भवू शकतात.
(४) शेजारील राष्ट्र देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकते. अशा वेळी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. म्हणून प्रत्येक राष्ट्राला आपली सैन्यदले अद्ययावत ठेवावी लागतात. राष्ट्रीय सुरक्षा चोख असणाऱ्या राष्ट्राचे अस्तित्व आणि सार्वभौमत्व अखंड टिकून राहते.