(१) मुदलियार आयोगाने सुचवलेल्या शिक्षणाच्या आकृतिबंधाची अंमलबजावणी अवघड झाल्याने १९६४ साली डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला गेला.
(२) या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १०+२+३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला.
(३) संपूर्ण देशात एकच शिक्षण पद्धती, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी या त्रिभाषा सूत्राचा शिक्षणात समावेश अशा गोष्टी आयोगाने सुचवल्या.
(४) अनुसूचित जाती-जमातींना प्राधान्य, अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदींत वाढ करणे अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या.
(५) राष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाचे आधुनिकीकरण करणे इत्यादी शिक्षणाची उद्दिष्टे कोठारी आयोगाने निश्चित केली होती.