Question
पोखरण अणुचाचणी.

Answer

(१) भारताशेजारील अण्वस्त्रधारी चीन व त्याच्या मदतीने अण्वस्त्र तयार करू पाहणारा पाकिस्तान यांच्याकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी भारताला अण्वस्त्र बनवणे आवश्यक होते.
(२) शांतता व स्वयंपूर्णता हे भारताचे धोरण होते.
(३) त्यानुसार भारताने १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
(४) मानवी वस्तीपासून लांब व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही, या अटींनुसार पोखरण हे ठिकाण या चाचणीसाठी निवडण्यात आले.
(५) १९९८ सालीही दुसऱ्यांदा याच ठिकाणी अणुचाचण्या घेतल्या गेल्या.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free